शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काल सेनेत, आज राष्ट्रवादीत प्रवेश - धामापूर सरपंचांचा पराक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:48 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागताच सत्तेच्या दाव्याचे खेळ सुरु झाले आहेत. बुधवारी धामापूर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या सोशल मिडिया सेलवरुन याचे फोटो सोशल मिडियावमतदारांनी आपले काम केले की विजयी झाल्यावर मतदारांना गृहीत धरून पक्षीय प्रताप सुरु होतात

देवरुख : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागताच सत्तेच्या दाव्याचे खेळ सुरु झाले आहेत. बुधवारी धामापूर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. निसटत्या मतांनी विजयी झालेल्या महिला सरपंचांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आज त्याच सरपंचांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सत्ता मिळाल्यावर मतदारांना गृहीत धरून झालेल्या या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

फेब्रुवारी २०१९मध्ये मुदत संपणाºया धामापूर तर्फे देवरुख ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बुधवारी पार पडली. यावेळी थेट सरपंच पद असल्याने चार उमेदवारांमधे चुरस होती. सरपंचपदासाठी गौरी गुरव आणि सुहासिनी भातडे यांच्यात जोरदार लढत झाली यात भातडे ११ मतांनी विजयी झाल्या. 

यातील भातडे यांनी गावविकास पॅनेलच्या माध्यमातून तर गुरव यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. निकाल जाहीर होताच भातडे व सदस्य अमित जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य रोहन सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी बुधवारी गावातून त्यांची मिरवणूक काढली. 

शिवसेनेत प्रवेश करून २४ तास होतात न होतात तोच भातडे आणि जाधव यांनी गुरुवारी सावर्डे येथे शेखर निकम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या सोशल मिडिया सेलवरुन याचे फोटो सोशल मिडियावर येताच याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षीय चिन्ह नसते त्यामुळे मतदारांना भुलवण्यासाठी गाव पॅनेल, गाव आघाडी, गाव विकास पॅनेल अशा गोंडस नावांचा वापर होतो मात्र मतदारांनी आपले काम केले की विजयी झाल्यावर मतदारांना गृहीत धरून पक्षीय प्रताप सुरु होतात.